भारताने कसोटी मालिका जिंकली, 2-0 ने बांगलादेशचा क्लीन स्वीप
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. यावेळी एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर आता कसोटी मालिकेत भारताने विजय प्राप्त केला आहे. ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली.
बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करण्यासोबतच भारतीय संघाने आशिया खंडात सलग 18व्या कसोटी मालिकेत विजयाची नोंद केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.