अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा  दिल्लीवर सहा विकेटने विजय
Admin

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा दिल्लीवर सहा विकेटने विजय

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला.
Published by :
Siddhi Naringrekar

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय आहे. रोहित शर्मा याने45 चंडूत 65 धावांची खेळी केली. रोहीतने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावा केल्या.

ईशान किशन याने रोहित शर्मासोबत 71 धावा दिल्या तर ईशान किशन याने 26 चेंडूत 31 धावा पूर्ण केल्या. तिलक वर्मा याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. विकेट हातात असल्यामुळे मुंबईने विजय मिळवला. तिलक वर्मा याने दमदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com