क्रीडा
World Cup 2023 : India Vs Australia : भारताच्या पहिल्याच सामन्यात गोलंदाजांची तुफान खेळी
भारताला विजयासाठी 200 धावांचे आव्हान आहे.
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना खेळवला जातोय. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाला केवळ 199 धावांवर रोखलंय. यावेळी रविंद्र जडेजानं सर्वोत्कृष्ट खेळी करत 3 विकेट्स घेतल्या. जाडेजाने 10 षटकात फक्त 28 धावा खर्च करत तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडले. जाडेजाने आपल्या दहा षटकांमध्ये स्टिव्ह स्मिथ, लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांना बाद केले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवनंही प्रत्येकी 2 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर दरारा निर्माण केला. तर अश्विन आणि सिराजनं प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या. भारताला विजयासाठी 200 धावांचे आव्हान आहे.