नवाब मलिकांवरुन सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; दानवेंच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर

नबाव मलिकांच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याचा मुद्दा विरोधकांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

नागपूर : नबाव मलिकांच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याचा मुद्दा विरोधकांनी विधान परिषदेत उपस्थित केला. दाऊदसोबत व्यवहार करणारे नवाब मलिक आता भाजपला कसे चालतात, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उपस्थित केला. दानवेंच्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. जेलमध्ये गेल्यानंतरही नवाब मलिकांना मंत्रि‍पदावर कायम कसं ठेवलं होतं, असा प्रतिसवाल फडणवीसांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com