CM मला तुमच्याशी बोलायचंय| पहिल्याच पावसाचा पहिला झटका; नालेसफाई झाली तर पाणी कसे तुंबले?

पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस सुरु झाला नाही तोपर्यंत अनेक समस्या निर्माण व्हायला लागल्या आहेत.
Published by :
shamal ghanekar

पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस सुरु झाला नाही तोपर्यंत अनेक समस्या निर्माण व्हायला लागल्या आहेत. रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला सुद्धा सामोरे जावे लागत आहे.

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहातुकीची कोंडी झाली आहे. तसेच अंबरनाथमध्ये नाल्यातला गाळ रस्त्यावर आल्याने वाहातुकीच्या कोंडीचा सामना सामन्यांना करावा लागत आहे. पहिल्याच दिवशी पावसाने पहिला झटका दिला आहे. तसेच अनेक ठिकाणच्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल देखील झाली आहे. नालेसफाई झाली असे सांगण्यात आले होते मात्र नालेसफाई झाली तर पाणी कसे तुंबले? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

CM मला तुमचयाशी बोलायचंय
CM मला तुमच्याशी बोलायचंय |राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला कोण जबाबदार ?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com