लोकसभा निकालानंतर भूकंप येणार; एकनाथ शिंदेंचं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे आज उद्घाटन झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले.

मुंबई : लोकसभा निकालानंतर भूकंप येणार असून विरोधक भूकंप सहन करु शकणार नाहीत, असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे आज उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. तसेच, अब की बार चारसौ पार ही आमचीही जबाबदारी आहे. तर राज्यातही अब की बार 45 पार, असा नवा नाराही एकनाथ शिंदेंनी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com