Eknath Shinde यांचा Manoj Jarange Patil यांना फोन; त्या 24 मिनिटांत घडलं काय?

मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 24 मिनिटं चर्चा झाली आहे. काहीच वेळापूर्वी फोनवरुन दोघांमध्ये संवाद झाला.
Published by :
Team Lokshahi

मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 24 मिनिटं चर्चा झाली आहे. काहीच वेळापूर्वी फोनवरुन दोघांमध्ये संवाद झाला. मात्र जरांगे पाटील आरक्षणाच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठ्यांना अर्धवट आरक्षण नको, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे आजही ठाम आहेत. जरांगे यांनी आता मराठा आरक्षणासंदर्भातल्या अभ्यासकांना बोलावलं आहे. अभ्यासकांसोबत चर्चा केल्यानंतर जरांगे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com