संजय राऊत यांनी केले नारायण राणेंचे कौतूक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे कौतूक केले आहे. माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, मी नारायण राणे यांना मानतो. कारण ते राजीनाने देऊन बाहेर पडले.
Published by :
Team Lokshahi

राज्यात अनेक राजकीय घडामोडी गेल्या सहा दिवसांपासून सुरु आहे. शिवसेना आणि नारायण राणे यांचा संघर्षही अनेकदा पाहण्यास मिळाला आहे. आता मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे कौतूक केले आहे. माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, मी नारायण राणे यांना मानतो. कारण ते राजीनाने देऊन बाहेर पडले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिलं आहे. ते म्हणाले, हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् पुन्हा निवडणुकीला सामोरं जा. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचं मात्र कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. राऊत यांनी म्हटलं की, जे फुटले त्यांची शिवसेना नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या.

मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे 22 लोक फुटले त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवली. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com