राम मांसाहारी होते; जितेंद्र आव्हाड यांचे विधान

जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे

मुंबई : राम मांसाहारी असल्याचा दावा शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामाला आदर्श मानून मटण खातो, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शरद पवार गटाच्या शिर्डीतल्या अधिवेशनात जितेंद्र आव्हाडांनी राम क्षत्रिय होते, क्षत्रियांचं जेवण मांसाहारी होतं, असा दावा केला आहे. क्षत्रिय असलेला राम मांसाहारी होते, असा दावा आव्हाडांनी केला. रामाला आदर्श मानून आपण मटण खात असल्याचेही जितेंद्र आव्हाडांनी म्हंटले आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याच्या निमित्तानं भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com