Ratnagiri Rain : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, नद्यांनी ओलांडली धाक्याची पातळी

रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढल आहे.
Published by :
shweta walge

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढल आहे.अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरले. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्‍याची तारांबळ उडाली. अर्जुना नदीच्या  पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर जवाहर चौकात पाणी शिरले तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी शिरले आहे. कोदावली आणि अर्जुना नदिनं पात्र सोडल्यानं पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.राजापूरला पुरानं वेढल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com