Uddhav Thackeray: 'संकटकाळात मनोहर जोशी बाळासाहेबांसोबत निष्ठेने राहिले', उद्धव ठाकरे म्हणाले...

उद्धव ठाकरे कालपासून बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली.
Published by :
Team Lokshahi

उद्धव ठाकरे कालपासून बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, “मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. बेळगाव-कारवार सीमा आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासह मनोहर जोशी आणि दत्ता साळवीही होते. जीवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे आपले दुर्दैव आहे."

मी आता मुंबईला निघालो आहे. शिवसेना परिवाराच्या वतीने मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. मनोहर जोशी पहिल्या फळीतील शिवसैनिक होते. जोशी यांच्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांमुळे शिवसेना अनेक संकटावर मात करून वेळोवेळी उभी राहिली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com