वेब स्टोरीज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील पर्यटनस्थळे नटली तिरंगा रंगांनी
भारताला स्वातंत्र होवून 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होत आहे. देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व पर्यटनस्थळे तिरंगा रंगानी रंगली आहे.
'आझादी का अमृत महोत्सव' या मोहिमे अंतर्गत भारतीय संसद यावेळी तिरंगा रंगांनी नटवण्यात आली आहे.
मुंबई येथील महाराष्ट्राचे राज्याचे मंत्रालय सुद्धा यावेळी तिरंगा रंगानी सजवण्यात आले आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथे असणाऱ्या इंडिया गट वरील विद्युत रोषणाई नागरिकांना आकर्षित करत आहे.
हैदराबाद येथील चारमीनारला सुद्धा भव्यदिव्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची राजधानी येथील 'गेटवे ऑफ इंडिया' सुद्धा तिरंगा रंगानी न्याहाळून उठली आहे.
मुंबई महानगरपालिकेला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे.
दक्षिणचा ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी का मकबऱ्याला देखील तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
आग्रा येथील ताज महाला सुद्धा अशाच प्रकारे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.