महाराष्ट्र

CM Eknath Shinde : मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची नाही ही राजकीय भाषा

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेतून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकारनं दिलं. सर्वांनी एकमताने आरक्षण दिलं आहे. कोणावरही अन्याय न करता आपण आरक्षण दिलं. मराठा आरक्षण टिकणार नाही अशी चर्चा सुरु झाली. मराठ्यांच्या संयम, शिस्तीचं कौतुक आहे. जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या. जरांगेंनी जे जे सांगितले ते ते केलं. 10 टक्के दिलेलं आरक्षण हे टिकणारं. स्वतंत्र मराठा आरक्षण दिलं.

मराठा आरक्षण कायद्यानं दिलं. इतकं वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मग मराठा समाजाला अजून आरक्षण का दिलं गेलं नाही. राज्य सरकारला 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. मागास असतानाही मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. आरक्षण का टिकणार नाही हे सांगावं. आरक्षण दिल्यानंतरही समाजात संभ्रम निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न. मराठा समाजाला आरक्षण देताना सर्व बाबी लक्षात घेतल्या गेल्या. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देता येणारं नाही, हे स्पष्ट सांगितलं होतं.

जरांगेंनी फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केले. जरांगेंची भाषा राजकीय आहे. एकेरी भाषेत बोलणं चुकीचं. जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याची मागणी करणं योग्य नाही. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. सर्वांना सोबत घेऊन राज्य पुढे न्यायचं आहे. हे करा, ते करा, हे गाव बंद, रस्ता बंद, ही काय भाषा आहे का ? मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची नाही ही राजकीय भाषा आहे. माझ्यावरही खालच्या पातळीची टीका केली गेली.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा