महाराष्ट्र

Chhagan Bhujbal | पंचनामे पूर्ण करून लवकरात लवकर भरपाई देणार; पालकमंत्र्यांचे आदेश

Published by : Lokshahi News

संदीप जेजूरकर, लासलगाव ( नाशिक ) | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. नुकसानग्रस्त भागांचा मंत्र्यांकडून पाहणी दौरा सूरू आहे. आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंचनामे पूर्ण करत लवकरात लवकर भरपाई देणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

येवला, लासलगाव भागात अतिवृष्टीमुळे शेती सोबत घरांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या भागात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. राज्यात सर्वच ठिकाणी एकाच निकषावर पूरग्रस्तांना समसमान मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असून कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.येवला – लासलगाव भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पंचनामे पूर्ण होताच लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर