राजकारण

गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान हा गैरसमज दूर झाला; जरांगे पाटलांचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, या कार्यक्रमादरम्यान मोदी मराठा आरक्षणावर काहीच न बोलल्याने जरांगे पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : आधी नरेंद्र मोदी हे गरीबांचे प्रश्न सोडवतील असा गैरसमज होता. पण, मोदी बोलले नाही. यामुळे गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान हा गैरसमज दूर झाला, अशी जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, या कार्यक्रमादरम्यान मोदी मराठा आरक्षणावर काहीच न बोलल्याने जरांगे पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरिबांच्या मुलांसाठी विनंती केली होती. मात्र, याविषयी नरेंद्र मोदी बोलले नाही. मराठा समाजाने नरेंद्र मोदी यांना येऊ दिले नसते. मोदी बोलले नाही हे बरे झाले कारण यावरून समजते की यांना गोरगरीब यांची गरज नसून आता ही लढाई आम्ही आमची लढणार. येथं येऊन नरेंद्र मोदी हे आरक्षण देऊ शकत नाही तर तेथून कुठं आरक्षण देणारं आहेत, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का