महाराष्ट्र

सरकारला १५ ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम; अन्यथा विमानतळाचे काम बंद पाडणार

Published by : Lokshahi News

सिद्धेश म्हात्रे । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकर्‍यांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आज 9 ऑगस्ट क्रांतिदिनी भूमीपुत्रांनी मशाल मार्च काढण्यात आला होता. या मार्चच्या माध्यमातुन सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास विमानतळाचे काम बंद पाडणार, असा इशाराच प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

आज 9 ऑगस्ट क्रांतिदिन या निमित्त दि. बा. पाटील यांच्या ज्वलंत विचारांची ज्योत सर्वत्र प्रज्वलित करत मशाल मार्च काढण्यात आला. नवी मुंबईतील सर्व 29 गावांसह ठाणे रायगड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हा मशाल मार्च काढण्यात आला. या मशाल मार्चच्या माध्यमातून राज्य सरकारकडे दिबांच्या नावाची मागणी करण्यात आली. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव न दिल्यास 16 ऑगस्ट पासून विमानतळाचे काम बंद आंदोलन करण्यात येणार असा इशाराच प्रकल्पग्रस्थानीं राज्य सरकारला दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार