भाजपने महिलांसाठी राबविलेल्या योजनांमुळे चार राज्यातील निवडणुकांमध्ये जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत भरभरुन मतदान केल्याचा दावा भाजप महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. याशिवाय इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गॅस सिलेंडर दर कमी केले जातील, असा विश्वास त्यांनी लोकशाहीसोबत एक्स्लुजिव्ह बातचीत करताना केला आहे.
दरम्यान, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे.