राजकारण

हे तर डरपोक सरकार; मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्दवर अंबादास दानवेंची टीका

चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी दौरा रद्द केल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे. यावरुन राज्यात मोठा गदारोळ झाला होता. परंतु, यानंतर सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी दौरा रद्द केल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. डरपोक सरकार, असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अंबादास दानवे म्हणाले, सीमा प्रश्नात काय होईल असं तर काही वाटत नाही. दोन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. आपले मंत्री दोन तारखा देऊन दौरा रद्द करताय हे डरपोक सरकार आहे. हे सीमा भागातील नागरिकांना न्याय देऊ शकणार नाहीत. बोम्मई व फडणवीस हे तू मारल्यासारख कर मी रडल्यासारख करतो असं सर्व सुरू आहे, असा घणाघात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानावरही अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. छत्रपतींचा अवमान करण्याचा अजेंडाच भाजपचा आहे. महाराष्ट्रात लहान मुलगाही सांगेल महाराजांचा जन्म कुठे झाला, असे त्यांनी सांगितले.

तर, ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. त्यातच उद्या यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती. जर त्यादृष्टीने पाऊल पडत असतील तर आनंद आहे, असे अंबादास दानवेंनी म्हंटले आहे.

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय आशरची नियुक्ती केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत ते म्हणाले की, नीती आयोगाच्या धर्तीची स्थापना मनमोहन सिंह यांनी ज्या उद्देशान स्थापन केली. त्यात महाराष्ट्राच्या भविष्याचे व्हिजन असायला हवे. मात्र बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे असे काय व्हिजन आहे. आशिष शेलार यांनीच या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. शिंदेंचे अनेक मिटींगही तेच बघतात. यावरून कुठे नेऊन ठेवलाय. महाराष्ट्र असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीस यांची कूकरेजाची जवळकीता ही खूप काही सांगून जाते. फडणवीस काय आणि शिंदे काय यांना सर्व सामान्यांची काहीही पडलेली नाही, अशीही टीका अंबादास दानवेंनी शिंदे-फडवीसांवर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut In Rajya Sabha : 'पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा'; पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला

Donald Trump : भारताला धक्का! डोनाल्ड ट्रम्पनं 1 ऑगस्टपासून भारतावर 25 टक्के कर आणि दंडाची केली घोषणा

Tsunami And Earthquake Alert : रशियात भूकंपानंतर 'या' 12 देशांवर त्सुनामीचे संकट! भारताबाबत मोठी माहिती समोर; सविस्तर वाचा

NISAR Mission : आता भूकंप आणि त्सुनामीचा इशारा आधीच मिळणार! 'निसार' उपग्रहामुळे हेही शक्य; कसं ते जाणून घ्या