राजकारण

संदीपान भुमरेंच्या टीकेला खैरेंचे उत्तर; हा दहा दिवसांचा पालकमंत्री

Published by : Shweta Shigvan-Kavankar

छत्रपती संभाजी नगर : राज्यात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरेंनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी मातोश्रीवर गेल्याने काही महत्त्व वाढणार नाही. मातोश्रीवर कुणी आलं काय आणि गेलं काय काही विषय नाही, असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावला होता. याला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते संदीपान भुमरे?

मातोश्रीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गेल्याने महाविकास आघाडी भक्कम होणार नाही. गाठीभेटीने महाविकास आघाडी भक्कम होत नाही त्यासाठी काम करावे लागत. राहुल गांधी मातोश्रीवर गेल्याने काही महत्त्व वाढणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा विषय वेगळा होता. आता हे स्वतः दुसरीकडे जातात म्हणून त्यामुळे मातोश्रीवर कुणी आलं काय आणि गेलं काय काही विषय नाही, असे संदीपान भुमरे यांनी म्हंटले होते.

या टीकेचा चंद्रकांत खैरेंनी समाचार घेतला आहे. संदिपान भुमरे हा दहा दिवसांचा पालकमंत्री. दहा दिवसानंतर संदिपान भुमरे पालकमंत्री राहणार नाही. त्याला महत्त्व मी देत नाही, अशा शब्दात खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

तर, शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याचे संकेत चंद्रकांत खैरेंनी दिले आहेत. मंत्रालयात हालचाली सुरू आहे. मंत्रालयातील अधिकारी म्हणतात, सरकार बदलणार. अधिकाऱ्यांनी गाठोडे बांधायला सुरु केलं आहे, मंत्रालयातून माहिती घ्या, सुगावा घ्या, असे त्यांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Rabindranath Tagore: रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी

World Red Cross Day 2024: जागतिक रेडक्रॉस दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांचा भाजपामध्ये प्रवेश

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव