Ambadas Danve
Ambadas Danve Team Lokshahi
राजकारण

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा फसवी- अंबादास दानवे

Published by : Sagar Pradhan

यंदा राज्यभरातच प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणीत आज शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सभागी झाले होते. या मोर्चानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून दानवेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले दानवे?

परभणीत माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की,"मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू अशी घोषणा केली. मात्र मागच्या 110 दिवसात राज्यभरामध्ये जवळपास 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ फसवी आहे. सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे कृषिमंत्री सध्या वेगळ्याच धुंदीत आहेत. असे दानवे यावेळी म्हणाले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले जात आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची गरज होती. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार, म्हणाले...