आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (9 मार्च) विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरुन आज सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
तसेच कांदा प्रश्न आणि अवकाळी पावसावरुन विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता देखिल आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.
अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे.