ताज्या बातम्या

हिवाळी अधिवेशन; १२ दिवसांत निघणार ६०हून अधिक मोर्चे

Published by : Siddhi Naringrekar

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात विविध मागण्यांसाठी अनेक संघटना नागपूरच्या विधान भवन परिसरात मोर्चे घेऊन धडकण्याची शक्यता आहे. ६० हून अधिक मोर्चे विधान भवनावर येऊ शकतात.

याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव १० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अत्याधुनिक पाच सुसज्ज दक्षता वाहने, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, बारा बॉम्बशोधक-नाशक पथके तैनात करण्यात आली आहेत. पुढील १२ दिवसांत तब्बल ६० मोर्चे निघणार असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. वादळी ठरलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात विविध मुद्दे नव्याने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर आता हिवाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण