शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत भाजपावर टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले की, प्रश्न विचारले की तोंड दाब आणि भुक्क्यांचा मार दे ही भाजपची संस्कृती.शेतकऱ्याने आपले प्रश्न मांडले तर भाजपच्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना इतका त्रास का होतो?
तसेच विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आपल्या हक्कासाठी शेतकरी दिल्लीला येत होते तेव्हा त्यांना रोखले. आता राज्यातील शेतकऱ्याने मंत्र्यांना प्रश्न विचारले तर भाजप कार्यकर्ते मंत्र्यासमोर शेतकऱ्यांना धक्काबुक्की करतात? शेतकरी विरोधी भाजपचा दिल्लीतील सत्तेचा मार्ग आता बळीराजा महाराष्ट्रातून अडवतील!असे वडेट्टीवार म्हणाले.