लोकशाही स्पेशल

Constitution Day | आज संविधान दिन… का साजरा केला जातो हा दिवस?

Published by : Lokshahi News

 भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याची परंपरा फार जुनी नाही, परंतु हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून ओळखल्याचा इतिहास आहे. खरे तर या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. होय, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली, पण त्याच्या दोन महिने आधी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने अनेक चर्चा आणि दुरुस्त्या करून अखेर संविधान स्वीकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.

संविधान दिन का साजरा केला जातो?
देशाच्या संविधानाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार व्हावा यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारताने आपली राज्यघटना स्वीकारली होती, त्यामुळे सामाजिक न्याय मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी निर्णय घेतला होता की भारत सरकार 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू करेल.

हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आज देशभरात संविधान दिनाचा उत्साह आहे. संविधान दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. या कार्यक्रमात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष संबोधित करणार आहेत. भाषणांनंतर राष्ट्रपती संविधानाची प्रस्तावना वाचन करतील. ज्याचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gunratan Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या “मटण हंडी” विनोदावर सदावर्तेंचा टोला; “हीच ठाकरे यांच्या विचारांची हंडी”

Independence day 2025 : स्वातंत्र्यदिन साजरा करताना तिरंग्याचा सन्मान राखा; ध्वज फडकवताना 'हे' नियम पाळा

Viral Video Raj Thackeray : दहीहंडी निमंत्रणावर राज ठाकरेंचं मिश्किल टिप्पणी “मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो”

'या' नेत्याच्या घरी मटण पार्टीचे आयोजन; थेट फडणवीसांना आमंत्रण, नेमकं प्रकरण काय?