मुंबईतील सिद्धीविनायक, शिर्डीतील साईबाबा, नांदेडातील गुरुद्वारातील प्रसाद आता बिनधास्त खाता येणार आहे...या ठिकाणांवरील प्रसादाला अन्न व औषध प्रशासनाने भोग प्रमाणपत्रं दिलं आहे...म्हणजेच या ठिकाणच्या प्रसादाची गुणवत्ता उत्तम आहे...यामुळे हा प्रसाद विदेशातही पाठवता येणार आहे
राज्यातील जनतेला स्वच्छ, सुरक्षित अन्न मिळावे, चांगल्या प्रतीची औषधे मिळावीत यासाठी स्वतंत्ररीत्या अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए कार्यरत असते. सर्वांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र सतर्क राहून ही यंत्रणा काम करते. एफडीआयने आता प्रसादाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे राज्यातील मोठ्या धार्मिक स्थळांवरील प्रसादाला भोग प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे भोग प्रमाणपत्र
एफडीएकडून 'इट राऊट' उपक्रमास सुरुवात
धार्मिक स्थळांवर अन्न सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण
व्यवस्थापनाच्या चर्चेनंतर प्रसादाच्या गुणवत्तेची तपासणी
मंदिर परिसरातील प्रसादांचा दुकानांचाही समावेश
धार्मिक स्थळांचे संपुर्ण ऑडीट करुन भोग प्रमाणपत्र
धार्मिक स्थळांनी भोग उपक्रमातंर्गत नोंदणी केल्यानंतर एफडीआय तपासणी करुन प्रमाणपत्र देते. आता येत्या काळात गणेश मंडळांसाठी हा उपक्रम राबण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना एफडीएकडून स्वच्छ व गुणवत्तापुर्वक प्रसादाच्या वाटपासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.