मला असं वाटत भारतीय जनता पार्टी विद्यमान, सगळ्याच खासदारांमध्ये मोठा बदल करू पाहाते आहे, अश्या प्रकारची माहिती आहे. बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना मैदानात उतरवण्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. बऱ्याच जुन्या जानत्या लोकांना भारतीय जनता पार्टी आताच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून, शासकीय अधिकाऱ्यांना देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती कार्यकर्त्यांपर्यंत आहे. भाजप फक्त देशाच्या चेहऱ्यावर निवडणुक लढणार आहे त्याना स्थानिक चेहऱ्याशी घेणेदेणे नाही. एकटे फडणवीस आरक्षणाच्या विरोधात आहे अशी भूमिका खास मराठा समाजात आहे. जाहिराती का देतात, फडणवीस यांनी एखाद्या गावात जाऊन बोलावं ना, असं अंबादास दानवे यांनी भाजपला आव्हान केला आहे.