मुंबईच्या मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याने घर नाकारल्याचा प्रकरणानंतर मराठी माणसांना घर न मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी आता मराठी प्रेमी संघटना आक्रमक होत आहेत.
पार्ले पंचम या संघटनेने मुख्यमंत्री आणि सर्व पक्षाच्या नेत्यांकडे आता नव्या इमारतीमध्ये पन्नास टक्के घरे मराठी माणसांना आरक्षित ठेवावीत आणि 20 टक्के घर ही लहान आकाराची बनवावीत आणि ती मराठी माणसांना आरक्षित ठेवावी अशी मागणी केली आहे.