Student Scholarship
STUDENT SCHOLARSHIP SCHEME: ELIGIBLE STUDENTS TO GET ₹12,000 ANNUALLY FROM CLASS 9 TO 12

Student Scholarship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पात्र विद्यार्थ्यांना मिळणार ₹१२,००० ची स्कॉलरशिप, जाणून घ्या कोण पात्र

Education Support: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आठवी उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी ₹१२,००० मिळणार आहेत.
Published on

विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आठवीच्या वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२,००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ही योजना मोठा आधार ठरली असून, डिसेंबर महिन्यात घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा सध्या देशभर चर्चेत आहे.

या योजनेच्या परीक्षेत एकूण ९० प्रश्न विचारले जातात, जे शैक्षणिक क्षमता चाचणीअंतर्गत विचक्षणशक्ती आणि तर्कशक्ती तपासणारे आहेत. गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांवर आधारित हे प्रश्न असून, एकाच दिवशी दोन्ही पेपर घेतले जातात. परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी एकूण ४८,००० रुपयांची मदत मिळते, ज्यामुळे आठवी नंतर शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. महाराष्ट्रासारख्या राज्यात लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसण्याची तयारी करत असून, ग्रामीण भागातील शाळांमध्ये विशेष जागृती मोहीम राबवली जात आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता निकषही स्पष्ट आहेत. विद्यार्थ्यांनी आठवीसाठी सर्व विषयांमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळवलेले असावेत, तर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ३.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. फक्त मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थीच अर्ज करू शकतात, असे केंद्र सरकारने नमूद केले आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध असून, शाळा आणि जिल्हा शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन दिले जाते. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूरसह विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अर्ज नोंदवले गेले आहेत.

या योजनेच्या माध्यमातून सरकार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करत असून, परीक्षेनंतर निकाल जाहीर होताच निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यांवर थेट रक्कम जमा होईल. अभ्यासकट्टे आणि कोचिंग सेंटर्समध्ये आता या परीक्षेची तयारी जोरदार सुरू झाली असून, पालकांमध्येही उत्साह आहे. विद्यार्थ्यांनी वेळीच अर्ज करून तयारी सुरू करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत, जेणेकरून ही संधी हातातून न सुटेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com