India vs Pakistan War : पाकड्यांना महागात पडला Missile-Drone Attack, भारताने असा हाणून पाडला डाव, जाणून घ्या गेल्या 24 तासांत काय काय घडलं ?

India vs Pakistan War : पाकड्यांना महागात पडला Missile-Drone Attack, भारताने असा हाणून पाडला डाव, जाणून घ्या गेल्या 24 तासांत काय काय घडलं ?

पूंछ, राजौरी आणि सांबा या दक्षिण काश्मीरमधील भागांमध्ये हे चकमकीचे सत्र चालू असताना भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) काल रात्रीपासून पाकिस्तानकडून प्रचंड गोळीबार सुरू झाला. भारतीय सुरक्षा दलांनीही त्याला तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे. पूंछ, राजौरी आणि सांबा या दक्षिण काश्मीरमधील भागांमध्ये हे चकमकीचे सत्र चालू असून दोन्ही बाजूंनी तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. (India vs Pakistan War)

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या अनेक चौक्या हाणून पाडले, नेमकी कशी झाली सुरुवात?

रात्री 09:08 च्या सुमारास पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील विमानतळावर रॉकेटने तसेच पठाणकोटवर क्षेपणास्त्र हल्ला केला.

त्यानंतर लगेच रात्री 09:10 च्या सुमारास उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट येथे पाकिस्तानकडून हल्ले सुरु असताना भारतीय लढाऊ विमानाने उड्डाण सुरु केले. भारतीय हवाई संरक्षण दलाकडून क्षेपणास्त्राने आणि ड्रोनने हल्ला करत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर पुन्हा रात्री 09:10 सुमारास पाकिस्तान जैसलमेरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच भारतीय सैन्याने 09:22 वाजता त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले. ज्यामुळे पाकिस्तानचा जैसलमेरवर हल्ला करण्याचा डाव उधळून लावण्यास भारताला यश मिळालं. याचवेळी भारताची एस-400 हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय असताना भारताकडून पाकिस्तानचे 30 हून अधिक हवाई हल्ले उधळून लावण्यात आले. त्यावेळी जैसलमेरच्या तीन चौक्यांवर गोळीबार सुरू होता.

रात्री 09:28 च्या सुमारास मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जैसलमेर, बारमेर, गंगानगर आणि बिकानेरच्या जिल्हाधिकारी आणि एसपींशी संवाद साधला. यावेळी मुख्य सचिव सुधांश पंत, गृह विभागाचे एसीएस आनंद कुमार, डीजीपी यूआर साहू, एसीएस शिखर अग्रवाल, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था विशाल बंसल, डीजी इंटेलिजेंस संजय अग्रवाल, सिद्धार्थ सिहाग हे देखील उपस्थित होते.

रात्री 09:35 च्या सुमारास जम्मू ते जैसलमेरपर्यंत भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची तीन विमाने पाडली आहेत.

रात्री 09:38 च्या सुमारास दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आणि चंदीगड आणि मोहालीमध्येही ब्लॅकआउट करण्यात आलं. तसेच रेषेवर जोरदार गोळीबार सुरु होता.

रात्री 09: 42 च्या सुमारास पाकिस्तानकडून पूंछ-राजौरी-अखनूरमध्ये मोर्टार हल्ला करण्यात आला ज्यामुळे कच्छ आणि भुजमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला. यावेळी संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानचा हा हल्ला हमासच्या हल्ल्यासारखाच होता.

रात्री 09:47 च्या सुमारास पाकिस्ताने सतवारी सांबा, आरएस पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आठ क्षेपणास्त्रे सोडली, जी एस-400 या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हाणून पाडले.

रात्री 09:53 च्या सुमारास पाकिस्ताने पुन्हा राजौरी आणि पूंछमध्ये जोरदार गोळीबार सुरू केला. तसेच रात्री 09:56 च्या सुमारास जयपुरमधील गंगानगर सीमेजवळ 25 ते 30 पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली आढळून आल्या.

रात्री 09:58 च्या सुमारास ठाणकोट आर्मी कॅम्पजवळ पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले. त्यानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू झाली.

रात्री 10:08 च्या सुमारास भारताने लाहोरवर ड्रोनने हल्ला केला.

रात्री 10:16-10:24 च्या सुमारास भारताने लाहोरनंतर सियालकोट आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर ड्रोन हल्ला करत सर्वात मोठा प्रतिहल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला असून लाहोर ते इस्लामाबादपर्यंत अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडीत केला.

रात्री 10:27 च्या सुमारास भारताने पाकिस्तानचे चौथे विमानही पाडले आहे. त्यानंतर पाकिस्तानने 10:33 च्या सुमारास भारतीय सैन्याने लाहोरमध्ये एकामागून एक चार मोठे स्फोट घडवून आणले ज्यामध्ये पोखरणमधील पाकिस्तानी जेट उद्ध्वस्त झाले.

रात्री 10:36 च्या सुमारास कराचीमध्ये अनेक स्फोट झाले. या हल्ल्यामुळे अनेक शहरांना आग लागली.

रात्री 10:39 च्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तानवर 100 क्षेपणास्त्रे रोखली. त्याचवेळी भारताने एका पाकिस्तानी पायलटला ताब्यात घेतले.

रात्री 10:45 च्या सुमारास पाकिस्तानने संपूर्ण देशात कर्फ्यू लागू केला, त्याच वेळी भारतीय नौदलानेही थेट पाकिस्तानवर हल्ला केला आहे.

भारताने कराची बंदरावर रात्री 12:00 ते 1:00 या वेळेच्या दरम्यान हल्ला केला. भारताकडून होणाऱ्या जलद हल्ल्यांना घाबरुन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ बंकरमध्ये लपले. भारताच्या वेगवान हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेतलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com