India Pakistan War: भारताचा पाकिस्तानला 'करारा जवाब'; सियालकोटमधील लॉन्च पॅड BSFने उडवला
पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (India-Pakistan War) भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले.
काल शुक्रवारी 9 मे 2025 रोजी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील 26 शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानचे हे हल्ले देखील भारताने हाणून पाडले. पाकिस्तानने हल्ला केलेल्या ठिकाणांमध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरातसह, बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला या ठिकाणांचा समावेश होता.
याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानच्या सियालकोटमधील लॉन्चपॅड भारतीय लष्कराने उडवलं आहे. दहशतवाद्यांनी हे लाँच पॅड्स तयार केले होते. या ठिकाणाहूनच दहशतवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर भारतावर ड्रोन हल्ले करत असल्याची माहिती मिळत असून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत हा लाँच पॅड नष्ट झाला आहे.