India Pakistan War : पाकिस्तानातील रावळपिंडी शहर स्फोटांनी हादरल, भारताकडून मोठी कारवाई
पाकिस्तानकडून काल रात्री भारताच्या अनेक शहरांमध्ये हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पूंछच्या रहिवासी क्षेत्रामध्ये पाकिस्तानचे बॉम्ब पडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतं आहे. त्याचबरोबर भारतानं पाकिस्तानचे चार एअरबेस उद्ध्वस्त केल्याचंही समोर आलं आहे. पाकिस्तानचे ड्रोनही भारतानं पाडलेत.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्याने शनिवारी पहाटे जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या तीन ते चार हवाई दलाच्या तळांना उद्धवस्त केल आहे. यामध्ये रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस, पंजाबमधील शोरकोट येथील रफीकी एअरबेस आणि चकवाल (पंजाब) येथील मुरीद एअरबेस यांचा समावेश आहे.
रावळपिंडीच्या नूरखान एअरबेसवर मोठा स्फोट करण्यात आला. रात्रीच पाकिस्तान सैन्याची 3 ते 4 एअरबेस भीषण स्फोटानं हादरली. लाहोरमधील रावळपिंडीच्या नूर खान एअरबेसजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. रावळपिंडीतील नूर खान एअरबेसजवळ आणि लाहोरमधील काही ठिकाणी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले.