देश-विदेश
Operation Sindoor : एअर स्ट्राईकमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार; पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त
ऑपरेशन सिंदूर: पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, एअर स्ट्राईकमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार
पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळू नये अशी इच्छा आहे. परंतु पाकिस्तानने तणाव वाढवला तर त्याला निर्णायक उत्तर देणार असल्याचं भारताने आधीच स्पष्ट केल आहे.
आताही सीमेवर पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 10 जवानांना ठार केलं आहे. तसेच चीनकडून पाकिस्तानने घेतलेलं जेएफ 17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती आहे. एअर स्ट्राईकमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.