India Pakistan Tensions
INDIA-PAKISTAN WAR 2026: US THINK TANK CFR WARNS OF RISING TENSIONS IN KASHMIR

India-Pakistan War : 2026 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध? अमेरिकेचा मोठा दावा

India Pakistan Tensions: अमेरिकेच्या CFR अहवालानुसार, काश्मीरमधील दहशतवादी घटना वाढल्यास २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

अमेरिकेतील प्रसिद्ध थिंक टँक काउंसिल ऑन फॉरेन रेलेशन्सने (CFR) जारी केलेल्या अहवालात भारत आणि पाकिस्तानमध्ये २०२६ मध्ये पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 'कॉन्फ्लिक्ट्स टू वॉच इन २०२६' या अहवालात काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्यास दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्ष भडकण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. हा अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण तज्ज्ञांच्या सर्वेक्षणावर आधारित असून, त्यात माजी राजदूत, सैन्य अधिकारी, प्रोफेसर आणि धोरण तज्ज्ञांचा समावेश आहे.

२०२५ च्या मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले होते. पाकिस्तानसमर्थित दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे भारतीय पर्यटकांना लक्ष्य केले, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. भारताच्या कारवाईत सीमापार अनेक दहशतवादी आणि त्यांचे नेते मारले गेले. चार दिवसांतच दोन्ही देशांमध्ये सीजफायर झाला असला तरी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये ३० पेक्षा जास्त दहशतवादी लपले असल्याची माहिती समोर आली आहे. CFR च्या अहवालानुसार, अशा घटनांमुळे पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.

अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या हितांवर होईल. याशिवाय, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही २०२६ मध्ये सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, अमेरिकी हितांवर त्याचा कमी परिणाम होईल असे म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यात अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यांमध्ये सीमेवर हिंसक झडपा झाल्या होत्या. यात २०० पेक्षा जास्त तालिबानी आणि दहशतवादी मारले गेले, तर २३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सीजफायर आहे, तरी दहशतवादाच्या मुद्द्यावर तणाव कायम आहे. CFR च्या या इशाऱ्याने आंतरराष्ट्रीय समुदायाची नजर या भागाकडे लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com