India-Pakistan War : मोठी बातमी, BSFकडून जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा
7 मे रोजी भारताने दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त केल्यांनतर आता पाकिस्तान आणि भारतातला तणाव वाढताना दिसत आहे. (India-Pakistan War) यातच पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे.
गुरुवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. दरम्यान, एका पाकिस्तानी पायलटलाही भारतीय सीमेत पकडण्यात आले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले. भारतानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक क्षेपणास्त्र नष्ट केलीत.
याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. BSFने जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहिती मिळत आहे. जैशची घुसखोरी BSFने हाणून पाडली आहे. पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. बीएएसएफ आणि दहशतवाद्यांमध्ये चममक झाली आणि यामध्ये गोळीबार होत 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.