Pakistan Begging : पाकड्यांनी मागितली भीक ; मात्र तरीही युद्धाची मस्ती जाईना

Pakistan Begging : पाकड्यांनी मागितली भीक ; मात्र तरीही युद्धाची मस्ती जाईना

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील 15 शहरांवर निशाणा साधला आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर' सुरु केले. यामध्ये भारताने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले आहे. काल रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील 15 शहरांवर निशाणा साधला आहे. अशातच आता भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात केली आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान युद्धामध्ये अधिक काळ तग धरु शकेल याचीदेखील शक्यता खूप कमी दिसून येत आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा शेअरमार्केटदेखील कोसळले आहे. त्याचप्रमाणे आता पाकिस्तानने कर्ज मागितले असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने आमचं मोठा नुकसान केले आहे. त्यामुळे आगाऊ कर्ज देण्याची मागणी पाकिस्तानने शेअर मार्केट कोसळल्याचे सांगितले आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले आहोत. त्यामुळे आनंतराष्ट्रीय मित्रदेशांनी मदत करावी, आशा प्रकारचे ट्वीट पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने ट्विट केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com