IND VS PAK : भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या ; आयातीवरही आणली बंदी, पुढे काय ?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारने पाकिस्तानबरोबरच्या पत्रव्यवहारांवर बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार अनेक पर्यायांचा अवलंब साधताना दिसत आहेत. अशातच आता भारताने पाकिस्तानच्या विरोधात नवीन निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक रणनीती लक्षात घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानमधून आयातीवर बंदी घातली आहे. भारत सरकारने पाकिस्तानमध्ये येणाऱ्या किंवा पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.वस्तू मुक्तपणे आयात करण्यायोग्य असोत किंवा विशेष परवानगीने आयात केल्या जात असोत, हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच मोठ्या संकटात आहे. भारतातून आयातीवरील बंदीमुळे पाकिस्तानच्या काही उद्योगांवर, विशेषतः भारतावर अवलंबून असलेल्या उद्योगांवर थेट परिणाम होईल.
पाकिस्तानमधून थेट आयात केलेल्या वस्तूंमध्ये सिमेंट आणि सुकामेवा यांचा समावेश आहे. यामध्ये ई-कॉमर्सद्वारे ऑर्डर केलेल्या पाकिस्तानी वस्तूंचाही समावेश आहे. याचा अर्थ असा की आता पाकिस्तानी वस्तू कोणत्याही माध्यमातून भारतात येऊ शकणार नाहीत.