AK-47 Rifle : इतिहास, वापर आणि भारतातील कायदेशीर निर्बंध
काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 हिंदू नागरिकांचा निष्पाप बळी घेतला. या दहशदवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी AK-47 या हत्याराचा वापर केला होता. AK-47 ही रायफल युद्धक्षेत्रावरही वापरली जाते.
भारतात कोणत्याही सामान्य माणसाने AK-47 ठेवणे बेकायदेशीर असले तरीही, दहशतवादी ते न डगमगता वापरतात. भारतामध्ये AK-47 रायफल वापरण्याची परवानगी फक्त आर्मी किंवा पोलिसांना आहे. कोणतीही सामान्य व्यक्ती ही रायफल वापरू शकत नाही. जर कोणाकडेही ही रायफल आढळली तर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. पण या रायफल सैन्य किंवा आतंकवादी का वापरतात? याबद्दल माहिती जाणून घेऊया.
AK-47 चा इतिहास :
AK-47 रायफलचे पूर्ण नाव ऑटोमॅटिक कलाश्निकोव्ह-47 आहे. ही रायफल मिखाईल कलाश्निकोव्ह यांनी 1947 मध्ये बनवली होती. एके-47 रायफल पूर्णपणे स्वयंचलित सेटिंगमध्ये 600 राउंड फायर करू शकते. ही रायफल सेमी-ऑटो मोडमध्ये प्रति मिनिट 40 राउंड आणि बर्स्ट मोडमध्ये प्रति मिनिट 100 राउंड फायर करते.
किती राऊंड फायर करु शकते ?
यातून सोडल्या जाणाऱ्या गोळीची रेंज 350 मीटर आहे, जी प्रति मिनिट 715 मीटर या वेगाने लक्ष्यावर आदळते. AK-47 मॅगझिनचे तीन प्रकार आहेत. त्यात 20 राउंड, 30 राउंड आणि 75 राउंडचे ड्रम मॅगझिन आहेत.या रायफलमध्ये एका वेळी 30 गोळ्या भरता येतात आणि ती एका सेकंदात 6 गोळ्या झाडते. ही इतकी शक्तिशाली बंदूक आहे की ती काही भिंती आणि कारच्या दारातून आत जाऊ शकते आणि त्यांच्या मागे लपलेल्या व्यक्तीला मारू शकते.
किती लोकांकडे आहे ?
पाणी, वाळू किंवा चिखल अशा कोणत्याही वातावरणात काम करू शकते. ही बंदूक फक्त 8 पार्ट्सनी बनलेली आहे आणि ती एका मिनिटात एकत्र करता येते. आधुनिक रायफलमध्ये ग्रेनेड लाँचर देखील जोडता येते. आज जगात 10 कोटींहून अधिक AK-47 आहेत, म्हणजेच जगातील प्रत्येक 70 लोकांकडे ही रायफल आहे.