पावसाळा म्हणजे गारवा, थंड हवामान आणि एक वेगळीच शांतता... पण त्यासोबतच येतो एक त्रासदायक अनुभव – कपड्यांमधून येणारा कुबट, ओलसर वास! विशेषतः जेव्हा कपडे नीट कोरडे होत नाहीत, तेव्हा त्यातून बुरशीसारखा वास पसरतो आणि कपडे घालण्याची इच्छाही उडते. लोकांसाठी ही अडचण अधिक गंभीर असते, कारण कमी सूर्यप्रकाशामुळे कपडे पटकन सुकत नाहीत. पण काळजी करण्याची गरज नाही! आम्ही तुम्हाला देतोय पाच सोपे घरगुती उपाय, जे कपड्यांतील वास दूर करून त्यांना ठेवतील स्वच्छ आणि सुगंधित – अगदी पावसाळ्यातसुद्धा!
कपडे धुताना डिटर्जंटसोबत 1 चमचा बेकिंग सोडा किंवा थोडा पांढरा व्हिनेगर मिसळा. यामधील नैसर्गिक आम्लधर्मीय गुणधर्म दुर्गंधी काढून टाकतात आणि कपड्यांना स्वच्छ बनवतात.
ओलसर कपडे कपाटात ठेवल्यास त्यातून वास येतोच आणि बुरशीही वाढते. कपडे पूर्ण सुकल्याची खात्री करा, अगदी पंखा, इस्त्री किंवा डिह्युमिडिफायर वापरा.
कपाटातील कपड्यांमध्ये नॅप्थालीन बॉल्स, सुगंधित हर्बल पिशव्या किंवा सुकलेली कडुलिंबाची पाने ठेवा. हे पदार्थ कपड्यांना ताजेपणा देतात आणि वास दूर ठेवतात.
सूर्यप्रकाश कमी असला तरी, जिथे शक्य असेल तिथे कपडे थोडावेळ ठेवावेत. सूर्यकिरणांमुळे बुरशी आणि बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे दुर्गंधी कमी होते.
दररोज कपडे धुणे शक्य नसल्यास, बाजारात मिळणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल फॅब्रिक स्प्रेचा वापर करा. हे स्प्रे वासही कमी करतात आणि सूक्ष्मजंतूही हटवतात.