जलद खाल्ल्याने पोटावर होतात 'हे' घातक परिणाम; जाणून घ्या
Eating Food : आपण अशा आधुनिक जीवनशैलीत आणि धावपळीच्या जगात जगत आहोत. जिथे लोक कमी वेळेत अधिक उत्पादनाचा विचार करतात. या गर्दीत, घाईघाईने प्रत्येक गोष्ट करायची असते. उदाहरणार्थ, घाईघाईत अन्न खाणे, रस्त्यावर वेगाने गाडी चालवणे, वेगाने सर्वकाही करणे हा आपला स्वभाव बनला आहे. व्यस्त जीवनशैली आणि वेळेची कमतरता ही आपली सवय झाली आहे. काही लोक तणाव किंवा चिंतेमुळे पटकन खातात.
परंतु, लोक खूप लवकर खाल्ल्याने गरजेपेक्षा जास्त अन्न खातात. कारण मन आणि शरीर दोघांचाही ताळमेळ बसत नाही की पोट खरंच भरलंय की नाही. त्यामुळे वजन वाढू लागते. जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक जलद खातात त्यांना जास्त वजन होण्याचा धोका तिप्पट असतो. त्याचबरोबर अनेक आजारांनाही बळी पडतात.
पचन समस्या
एकत्र जास्त आणि पटापट खाल्ले तर पचनक्रियेवर ताण पडतो. त्यामुळे अपचन, सूज आणि अस्वस्थता यासारख्या समस्या सुरू होतात. संशोधक आणखी एक कारण सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती जलद अन्न खाते, तेव्हा तो अन्नासोबत हवाही गिळू लागतो. त्यामुळे पोटात सूज येते. अन्न हळूहळू चावून खाल्ल्याने अन्नाचे छोटे तुकडे होऊन पोटात पोहचते.
रक्तातील साखरेची पातळी वाढणे
जास्त वेळा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. विशेषत: जेव्हा उच्च कार्बोहायड्रेट आहार घेतला जातो, यामुळे इन्सुलिनच्या नियमनावर संभाव्य परिणाम होतो आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो..
हळू खाण्याचे फायदे
- हळूहळू खाणे फायदेशीर आहे आणि जलद खाण्याच्या तुलनेत कमी प्रमाणात अन्न खाण्यास मदत करते. हळू खाण्याच्या फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे.
- हार्मोन्समध्ये वाढ होऊन तृप्ती होते.
- वजन नियंत्रणात मदत करते.
- चांगले पचन होते.
- पोषक तत्वांचे चांगले शोषण होते.
- तणाव कमी करते.