Mahatma Gandhi
Mahatma GandhiTeam Lokshahi

महात्मा गांधींनी आजच्या दिवशी केला होता मिठाचा सत्याग्रह

Published by :
Team Lokshahi

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी 6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा सत्याग्रह (Salt Satyagraha) केला होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी भारतातील ब्रिटिश सरकारने (British government) मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या (tax) विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने (Dandi Yatra) झाली.

दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून (Sabarmati Ashram) सुरु झाली होती. हजारोंच्या संख्येने लोक या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा 24 दिवस आणि 390 किलोमीटर ही यात्रा चालली होती. 12 मार्चला अहमदाबागहून (Ahmedabad) निघालेली यात्रा 6 एप्रिलला दांडी येथे पोहचली. मिठाचा सत्याग्रह हा एक सहकार चळवळीचा भाग होता. गांधीना या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकसंघटन आणि लोकजागृती करायची होती.

या घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा, कर्नाटकामधील शनिकट्टा, शिरोड व मालवण इत्यादी ठिकाणे मिठाचे सत्याग्रह विशेष गाजले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com