आज काय घडले : कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीकडे
सुविचार
सत्य ही एक अशी शस्रक्रिया आहे की, ज्याने सुरुवातीला वेदना होतात, पण दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळते.
आज काय घडले
१८५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
१८५२मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलितांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली.
१९९८ मध्ये ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या देशभक्तीपर गीताचे रचनाकार कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
आज यांचा जन्म
पत्रकार, प्रार्थना समाजाचे संस्थापकापैकी एक नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांचा १८३८ मध्ये जन्म झाला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ भाऊसाहेब तारकुंडे यांचा १९०९ मध्ये जन्म झाला.
इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा १९१४ मध्ये जन्म झाला.
लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा १९२६ मध्ये जन्म झाला. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.
भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा १९८० मध्ये जन्म झाला. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकविले.
आज यांची पुण्यतिथी
संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी १३५० मध्ये समाधी घेतली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे १९९६ मध्ये निधन झाले.
परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित गोरखा रायफल्सचे भारतीय सैन्य अधिकारी कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचे १९९९ मध्ये निधन झाले.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश योगेश कुमार सभरवाल यांचे २०१५ मध्ये निधन झाले.