'आयपीएल खेळताना कामाचा ताण नसतो का ?', सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंवर केली टीका
Admin

'आयपीएल खेळताना कामाचा ताण नसतो का ?', सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंवर केली टीका

टी-20 विश्वचषक 2022 मधून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर भारतीय खेळाडूंवरील टीका कमी होण्याचे नाव घेत नाही आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

टी-20 विश्वचषक 2022 मधून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर भारतीय खेळाडूंवरील टीका कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आता दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत संताप व्यक्त केला आहे. टीम इंडियाकडून खेळताना प्रत्येक वेळी वर्कलोडची चर्चा होते, हा वर्कलोड आयपीएलदरम्यान का होत नाही, असे त्याने म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले, संघात बदल होणार आहेत. जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही, तेव्हा बदल होतील. आम्ही नुकतेच पाहिले की न्यूझीलंडला जाणाऱ्या संघात काही बदल झाले आहेत. टीम इंडियामध्ये हे संपूर्ण वर्ष, कामाच्या वैकल्पिक ओझ्यामुळे अनेक खेळाडूंना द्विपक्षीय मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. सुनील गावसकर यांनी याबाबत सांगितले आहे. गावस्कर म्हणाले, 'तुम्ही आयपीएल खेळा. संपूर्ण हंगाम खेळा. बाकी सगळीकडे तुम्ही धावतच राहतात. तुम्ही तिथे थकले नाहीत का? कामाचा बोजा नाही का? जेव्हा तुम्हाला भारतासाठी खेळायचे असते आणि तेही तुम्ही नॉन ग्लॅमरस देशात गेल्यावर तुमच्यावर कामाचा ताण निर्माण होतो. हे चुकीचे आहे.

भारतीय खेळाडूंचे लाड थोडे कमी करावे लागतील, असेही गावस्कर म्हणाले. बीसीसीआयने त्याला कडक संदेश देण्याची गरज आहे. गावसकर म्हणतात, 'वर्कलोड आणि फिटनेस हातात हात घालून जाऊ शकत नाहीत. तुम्ही तंदुरुस्त असाल तर कामाचा ताण हा प्रश्न आलाच कुठे? आपण जे थोडे लाड करतो ते कमी करावे लागेल. आम्ही तुम्हाला संघात घेत आहोत. ते रिटेनर फी देखील भरत आहेत. जर तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे खेळत नसाल तर रिटेनर फी देखील मागे घेऊ नका.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com