मुंबई
India-Pakistan War : Tata Memorial Hospital ला धमकीचा मेल; हॉस्पिटलच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील टाटा रुग्णालयाला धमकीचा मेल आला आहे.
पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केलं. यानंतर काही वेळातचं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही देशांच्या सीमारेशेवर जोरदार हल्ले सुरु आहेत. ज्यामुळे दोन्ही देशात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाली आहे.
अशातच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील टाटा रुग्णालयाला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रुग्णालयात पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
संपूर्ण रुग्णालयात सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. ज्या मेलवरून ही धमकी आली आहे त्याचा आयपी ॲड्रेस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.