मुंबईत 10 टक्के पाणीकपात; सातही धरणांतील जलसाठा 6 टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर आला आहे. ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबईत 5टक्के पाणी कपात करण्यात आली होती. आता बुधवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com