Crime
CrimeTeam Lokshahi

जुन्या वादातून अकरावीच्या विद्यार्थ्यांचा गळा चिरला, आरोपी ताब्यात

जुन्या वादातून चाकूने वार करून एकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली

वाशिम : जिल्ह्यातील कारंजा शहरामधील विद्याभारती महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्याने जुन्या वादातून चाकूने वार करून एकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक विद्यार्थी गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हल्ला करणारा विद्यार्थी निखिल मेहरे याला पोलिसांच्या ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
केंद्राच्या दबावापोटी सुरू असलेला डाव उधळला जाईल : संजय राऊत

पोलीस अधीक्षक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अल्पवयीन फिर्यादी व आरोपी निखिल मेहरे हे एकाच महाविद्यालयात शिकतात. फिर्यादी हे अकरावी विज्ञान शाखेचे तर आरोपी हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे. फिर्यादीचा मित्र बिलाल याकूब खान व मेहरे यांच्यात मागील ऑगस्ट महिन्यापासून विविध करणावरून वाद सुरू होता.

सकाळी नऊ वाजता फिर्यादी आणि त्यांच्यासोबत गुलाम दस्तगीर, बिलाल याकूब खान असे तिघेजण कॉलेजला जात असताना निखिल मेहेरे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र यांनी बिलाल याकूब खान याला शिवीगाळ केली. बिलालने त्यांना शिविगाळ का करतो, असे विचारले. तर निखिल मेहरे याने त्याच्या खिशातून एक चाकू काढून बिलाल याकुब याला जीवे मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर मारला.

Crime
शिवसेना व वंचितच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध? शरद पवार म्हणाले...

त्याला सोडवण्याकरिता फिर्यादी आणि त्याचे मित्र गेले असता निखिल मेहरे यांनी फिर्यादीचा मित्र याच्या मानेवर आणि फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर चाकूने मारहाण केली. त्याच्यासोबत असणारे यांनी सुद्धा लाथा बुक्क्याने मारहाण केली. शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. यावरून आरोपी निखिल मेहरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com