माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तूटला

माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तूटला

Published by :
Published on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तूटल्याची घटना घडली आहे. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.

कुडाळ माणगाव खो-यातील निर्मला नदीला पुर आला आहे.त्यामुळे आंबेरी पुलावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे माणगाव खो-यातील पुढील 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तूटला आहे. जिल्ह्यात ठीकठीकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ते बंद झाले असून नागरीकांचा खोळंबा झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com