महाराष्ट्र
अखेर ठरले! 'या' ठिकाणी होणार ९७ वे साहित्य संमेलन
पुण्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुणे : 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जागा निश्चित झाली असून जळगावमध्ये होणार आहे. पुण्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सातारा, औदुंबर (जिल्हा सांगली), अळमनेर, जालना या चार पर्यायांचा विचार झालेला होता. यातील जळगावच्या अळमनेरमध्ये साहित्य संमेलनासाठी निवडण्यात आली.
पुण्यातील साहित्य परिषदेत सातारा, औदुंबर, अळमनेर, जालना या चार पर्यायांचा विचार झालेला होता. साहित्य संमेलनाची जागा निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने भेटी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या जागांची पाहणी केली होती. यातील जळगावच्या अळमनेरमध्ये साहित्य संमेलनासाठी निवडण्यात आली. जून महिन्यात 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरु होईल.