औरंगाबादच्या नामांतरानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप, आतापर्यंत 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

औरंगाबादच्या नामांतरानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप, आतापर्यंत 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहर काँग्रेसच्या (Congress) तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणाच्या प्रस्तावाला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi ) सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतर औरंगाबाद काँग्रेसमध्ये आता संतापाची लाट पसरली आहे. औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी (Hisham Osmani ) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहर काँग्रेसच्या (Congress) तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

औरंगाबादच्या नामांतरानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप, आतापर्यंत 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल होणार, फडणवीसांच्या भेटीची शक्यता!

गेल्या अनेक दशकांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे अशी मागणी शिवसेना, भाजप आणि हिंदुत्त्ववादी संघटनेकडून करण्यात येत होती. या मागणीला वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध करण्यात येत होता. मात्र, बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत अपेक्षेप्रमाणे नामांतराचे मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या 'धाराशीव' नामकरणास कॅबिनेटने मान्यता दिली. दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न गेली 25 ते 30 वर्ष होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारचं काऊंडडाऊन सुरु असताना दोन मोठे निर्णय घेतले.

औरंगाबादच्या नामांतरानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप, आतापर्यंत 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत..., एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट

अनेक वर्षे नामकरणाला विरोध करणारा काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असताना प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने औरंगाबादेतील काँग्रेसमधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांमध्ये संताप आणि नाराजी आहे. यामुळे अनेकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वप्रथम काँग्रेसचे औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे फेसबुक पोस्ट वरून जाहीर केले. हा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना पाठविल्याचे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com