महाराष्ट्र
भाजप नेते राम कदम आणि अतुल भातखळकर यांना अटक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते आक्रमक होत, आहेत त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांबरोबरच खंडणीखोर ठाकरे सरकार हटाव, गृहमंत्री अनिल देशमुख भगाओ म्हणतं भाजप नेते अतुल भातखळकर आणि राम कदम यांनी दादर येथे तीव्र निदर्शने केली. या नंतर ते राज्यपालांच्या भेटीसाठी निघाले असताना मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
राम कदम यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. राज्यपालांना खंडणीखोर सरकारविरोधात निवेदन द्यायला जात असताना आम्हाला माटुंगा पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली. असे कॅप्शन देत त्यांनी फोटो देखील ट्विट केले आहेत.