महाराष्ट्र
CM Uddhav Thackeray | “१५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी ८.०० वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी लशींचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. तसेच उद्या टास्कफोर्सच्या बैठकीत हॉटेल्स, मॉल्स, आणि अन्य आस्थापनांच्या वेळापत्रकावर निर्णय होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे मुद्दे
पावसाच्या काळात प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी
दरड कोसळण्यावर कायमस्वरुपी उपाययोजनांची गरज
आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा
५० टक्क्यांची अट शिथील होईपर्यंत आरक्षण नाही
राज्यात दररोज ८ लाख जणांच लसीकरण
मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब सुरू
लशींच्या डोसवर सर्वांची शिथीलता अवलंबून